Headlines News :

topads

Home » » भारतीय चित्रपटांत चुंबनाची गरज नाही: जेनेलिया

भारतीय चित्रपटांत चुंबनाची गरज नाही: जेनेलिया

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:09 AM

मुंबई: 'भारतीय चित्रपटांमध्ये चुंबनदृश्यांची काही आवश्यकता नाही. केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुतेक वेळा त्याचा वापर केला जातो', असे अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने म्हटलंय.
'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून नंतर 'जाने तु या जाने ना' या चित्रपटात आपल्या कौशल्याची दखल जाणकारांना घ्यायला लावून आता 'फोर्स' या चित्रपटात जॉन अब्राहमबरोबर काम करत हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाचा 'फोर्स' जेनेलियाने दाखवून दिलाय. फोर्स'मध्ये जॉनबरोबर काही प्रणयदृश्ये असल्याबद्दल एका इंग्रजी वृत्तपत्राने जेनेलियाला छेडले असता ती म्हणाली, 'आम्ही दोघेही कॅमेरावर रिलॅक्स दिसतोय आणि आमची जोडीही चांगली दिसते आहे. 'फोर्स'मध्ये अनेक जवळीक दाखवणारी दृश्यं आहेत. हा एक मारधाडपट आहे, पण त्याच वेळी दोन प्रौढ व्यक्तींमधली प्रेमकथाही आहे. त्यामुळे चित्रपटात प्रणय साहजिकपणे आहेच.'
पण याच वेळी भारतीय चित्रपटसृष्टीत चुंबन दृश्यांची गरज नसते असेही तिने स्पष्ट केले.जेनेलियाचा पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रितेश देशमुख याच्याशी असलेली तिची मैत्रीही चर्चेचा विषय ठरत असते. त्याबद्दलही जेनेलियाने दिलखुलास उत्तर दिलं; 'माझ्या इतरांशी असलेल्या मैत्रीपेक्षा रितेशशी माझी मैत्री बराच काळ टिकलेय. मी माझा पहिला चित्रपट त्याच्याबरोबर केला. जेव्हा तुम्ही तुमची कारकिर्द एखाद्याबरोबर सुरू करता तेव्हा तुम्ही मित्रच होता. ते केवळ सह-कलाकाराचं नातं उरत नाही. म्हणून रितेश आणि माझ्यामध्ये मैत्री कायम आहे. पण जेव्हा काही सांगण्यासारखं असेल तर मी जगाला ते सांगेन.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU TRIBUNE - All Rights Reserved
Template Design by Creating Website Published by Mas Template