Headlines News :

topads

Home » » सीमा’शक्ती वाढविण्यावर भारताचा भर

सीमा’शक्ती वाढविण्यावर भारताचा भर

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:05 AM

स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर
चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती लद्दाख भागात आपली क्षमता वाढविण्याच्या दिशेने पावले उचलताना भारतीय हवाई दलाने लढाऊ आणि जड वाहतूक विमानांसाठी कारगिल आणि न्योमा येथील आपले हवाई अड्डे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. न्योमा येथील हवाई अड्ड्याचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी सांगितले.
या दोन्ही हवाई अड्ड्यांचे विस्तारीकरण आणि अद्ययावत करण्यामुळे हवाई दलाची संरक्षण आणि मारक क्षमता वाढणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, सर्वच प्रकारच्या विमानांच्या कार्यान्विततेसाठी कारगिल हवाई अड्ड्याचाही विस्तार करण्याची आमची योजना आहे. दरम्यान, हवाई दलातील प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या कंपनीसोबत प्रशिक्षण विमानांच्या खरेदीचा १६५० कोटी रुपयांचा करार याच महिन्यात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU TRIBUNE - All Rights Reserved
Template Design by Creating Website Published by Mas Template